स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी ‘सामूहिक जागरण’
मजदूर-किसान संघर्ष रॅली सीआयटीयु-अखिल भारतीय किसान सभा-अखिल भारतीय शेतमजूर युनियन ५ सप्टेंबर २०१८ – चलो लोकसभा १४ ऑगस्ट २०१८ - स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी ‘ सामूहिक जागरण ’ आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून आता सत्तर वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आपण भारतीय नागरिकांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ब्रिटिशांशी शंभर वर्षांपेक्षा जास्त काळापर्यंत निकराचा लढा दिला. तो कुणा व्यक्ती किंवा पक्षाने एकट्याने दिलेला लढा नव्हता. ह्या लढ्यामध्ये अनेक ठिकाणी देशातील कष्टकरी जनता, कामगार वर्ग, शेतकरी, आदिवासी हे सर्व आघाडीवर होते. आर्थिक शोषण आणि सरंजामी दमन याच्या विरोधात लढत असतानाच त्यांनी असे शोषण आणि दमन लादणाऱ्या वसाहतवादी सत्तेविरोधात देखील लढा दिला. आपले वाडवडील जेव्हा अजिंक्य समजल्या जाणाऱ्या ब्रिटिश साम्राज्यवादी सत्तेविरुद्ध लढत होते, तेव्हा देशाच्या, आपल्या मुलाबाळांच्या, नातवंडा, पंतवंडांच्या भवितव्याबद्दल त्यांनी काही स्वप्ने उराशी बाळगली होती. शेकडो, हजारो कामगार, युवा, विद्यार्थी, महिला, जे स्वातंत्र्यासाठी लढले, त्यांनी सर्वस्वाचा त्या